‘मराठी बालसाहित्य: प्रवाह आणि स्वरूप’ (१९९५) हा त्यांचा बालसाहित्यासंबंधीचा सांगोपांग विवरण करणारा ग्रंथ महत्त्वाचा आहे. भा.रा.भागवत यांच्या विविधढंगी चुरचुरीत साहित्याचे संपादन त्यांनी ‘भाराभर गवत’ (१९८८) या ग्रंथात केले असून त्यांच्या विनोदी व खुसखुशीत लेखन-प्रवृत्तचे दर्शन
मार्मिक परंतु जिव्हाळ्याने घडविले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्यांपैकी ‘स्पर्शवेली’, ‘छाया झालीसे प्रकाश’, ‘हुंकार’, ‘मा निषाद’ व ‘घरटं’ या उल्लेखनीय आहेत. ‘जे नेत्री साठविले’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘पांढरा चाफा’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक अत्यंत मनोवेधक आहे. हिंदी कथासम्राट
प्रेमचंद यांच्या काही कथांचा मराठी अनुवाद करून लीलावतींनी मराठी साहित्यात भर घालण्याची कामगिरी केली आहे. बाल साहित्य संस्था निर्मितीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.लीलाताईनी बालांसाठी व कुमारांसाठी कविता, कथा व कादंबरी असे प्रचुर लेखन केले आहे.( संदर्भ - महाराष्ट्र नायक)